आतले दृश्य पाहून सर्वजण चकित झाले.. वैज्ञानिकांना सापडली सुग्रीव ची रहस्यमय गुहा.. आजही या ठिकाणी..

मित्रांनो, आपल्या भारतामध्ये एक अशी गुहा आहे जी सुग्रीव गुहा म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील संशोधकांना रामायणातील अवशेष शोधत असताना एक अशी गुहा मिळाली जी सामान्य दिसत होती परंतु संशोधक गुहेच्या आत गेले तेव्हा त्यांना समजले की, ही गुहा सामान्य गुहा नाही. ही गुहा रामायण कालीन असून येथे सुग्रीव आपला मोठा भाऊ बाली याच्यापासून लपून राहत होते.

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या गुहेच्या काही भागांना सर’कार द्वारे बंद करण्यात आले आहे. असे का ? याचे उत्तर कोणाकडेही नाही. या गुहेमध्ये संशोधकांना असे काय दिसले ज्याने त्यांनी ओळखले की, ही सुग्रीवची गुहा आहे. रामायण मध्ये जेवढ्या चरित्रांचा उल्लेख आहे त्या सर्वांच्या भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. राजा दशरथ व त्याच्या तीन पत्नी,

गुरु वशिष्ठ, निषाद राज, राजा जनक, विभिषण, अंगद ई. जेवढी व्यक्तिमत्व राम कथेशी जोडली गेली आहेत ती आपल्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत. यापैकी महत्त्वपूर्ण असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे सुग्रीव. किष्किंधाचे राजा आणि प्रभू श्रीराम यांचे मित्र. रावणाने सीतचे हरण केल्यानंतर सीतेच्या शोधात प्रभू श्रीराम निघाले असता वाटेत त्यांची भेट सुग्रीव याच्याशी होते.

याच वेळी प्रभू श्रीराम यांना बाली ने सुग्रीव वर केलेल्या अन्याया विषयी समजते. सुग्रीवला आपला मित्र मानून श्री राम सुग्रीवला बालीच्या त्रासापासून मुक्त करण्याचं वचन देतात आणि त्याला किष्किंधाचा राजा घोषित करतात. असे म्हटले जाते की, ज्या ऋषीमुख पर्वतावरती राम आणि सुग्रीव यांची भेट झाली होती तो पर्वत कर्नाटक येथील हम्पी येथे आहे.

हम्पी पूर्वी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. येथे वानर राज सुग्रीव आणि बाली ची राजधानी किष्किंधा नगरी वसलेली होती. हम्पी आणि हम्पीच्या आजूबाजूच्या क्षेत्रात रामायण कालीन अवशेष तसेच प्रभू श्रीराम तेथे येऊन गेल्याचे साक्षी पुरावे आहेत. काही वर्षांपूर्वी येथे संशोधन केले गेले होते परंतु त्यावेळी माहित नव्हते की, ही जागा रामायण काळाची जोडली गेलेली आहे.

ऋषीमुख पर्वतावर रामायण कालीन बरेच अवशेष आहेत त्यापैकी एक आहे सुग्रीवची गुहा. संशोधनकर्त्यांनी ह्या गुहेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना असे काही पुरावे सापडले जे रामायण काळातील सुग्रीवच्या गुहेशी जोडले होते. अधिक संशोधन केल्यानंतर त्यांना समजले की, ही तीच गुहा आहे जीथे राम सुग्रीव यांना भेटले होते. रामायणामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार,

बाली आणि सुग्रीव यांचे जेव्हा यु-द्ध झाले होते तेव्हा सुग्रीवला वनात पळून जावे लागले. सुग्रीव वनात येऊन या गुहेमध्ये राहिले होते. अजून एक कथा अशी आहे की, याच ऋषीमुख पर्वतावरती ऋषी मा’तंग यांचा आश्रम होता. बालीने आश्रम अपवित्र केला या रागाने ऋषींनी त्याला श्राप दिला होता. त्याच श्रापानुसार बाली ज्यावेळी ह्या क्षेत्रात येईल तेव्हा त्याचा मृ’त्यू होईल.

सुग्रीव त्या गुहेत राहण्याचे हेच कारण होते. सुग्रीव ज्या गुहे मध्ये राहिले तेथे आजही त्यांची मूर्ती पूजा केली जाते. सुग्रीवच्या गुहे शेजारी अजून बऱ्याच गुहा आहेत ज्या रामायण काळाशी जोडल्या आहेत. या ठिकाणी अशा गुहा सुद्धा आहेत ज्या स’रकार द्वारे बंद करण्यात आल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *