NMJOKE

अभिमन्यू खऱ्या आयुष्यात पहा

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कलर्स मराठीवरील मालिकेत सध्या अभिमन्यू ही व्यक्तिरेखा खूपच गाजत आहे. अभिमन्यूला खरेतर कोणत्याही जाड मुलीशी लग्न करायचे नसते, त्याला फिट अशी मुलगी पाहिजे असते. परंतु काही अडचणींमुळे त्याला लतिका या मुलीबरोबर लग्न करावे लागते.

लग्नानंतर या दोघांमध्येही बऱ्याच अडचणी आल्या, बरीच भांडणे झाली तरीही अजूनपण हे दोघे एकत्र आहेत. लतिका ही खूप समंजस अशी मुलगी दाखवली आहे. याच अभिमन्यूच्या खऱ्या आयुष्यातील थोडक्यात अशी माहिती आपण घेणार आहोत. अभिमन्यूचे खरे नाव समीर परांजपे आहे. २० नोव्हेंबर १९९० ला समीरचा जन्म पुण्यात झाला.

 

त्याचे उच्च शिक्षण हे विद्यार्थी गृह कॉलेज पुणे येथून झाले आहे. समीरने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे म्हणजेच तो एक इंजिनिअर आहे. परंतु लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने समीरने नाटकेही करायला चालू केली. २०१८ मध्ये आलेल्या ‘माझे पती सौभाग्यवती’ यामध्ये त्याने पहिल्यांदा अभिनय केला आहे.

‘क्लास ऑफ 83’ या २०२० मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. समीरला खरी ओळख ही त्याच्या ‘गोठ’ या मालिकेपासून मिळाली. समीर परांजपे हा ‘गोठ’ या मालिकेत अभिनेत्री रुपल नंद बरोबर आपल्याला दिसला होता. त्याही जोडीस दर्शकांनी पसंती दिली. समीरचे लग्न झालेले आहे आणि त्याच्या बायकोचे नाव अनुजा परांजपे आहे.

या दोघांचे २७ नोव्हेंबर २०१६ ला लग्न झाले. हे दोघेही लग्नाआधी ३ वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांची मैत्री ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून आहे. समीर आणि अनुजा यांचा प्रेमविवाह झाला आहे. तुम्हाला सुद्धा समीर म्हणजेच अभिमन्यूचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका.

Exit mobile version