उदयनराजे पोरांचा ताफा घेऊन रायगडाकडे निघाले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना या विरोधात कोणीतरी बोलले पाहिजे. ज्या घराण्याचे नाव मी लावतो त्यावेळी माझी नैतिक जबाबदारी आहे. छत्रपतींचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान होत असून ही गंभीर बाब आहे. त्यासाठी आम्ही रायगडावर निघालो असून तेथे छत्रपतींच्या समाधीजवळ जाऊन आम्ही वेदना मांडणार असून आत्मक्‍लेष करणार आहोत, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

मातीसाठी निर्धार शिवसन्मानाचा या माध्यमातून रायगडावर जाऊन उद्या (शनिवारी) छत्रपतींच्या समाधींसमोर उदयनराजे आत्मक्‍लेष करणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज रायगडकडे कूच केले. जलमंदिर पॅलेस या निवासस्थानातून निघाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व रायगडकडे ते मार्गस्थ झाले आहेत.

छत्रपती उदयनराजे म्हणाले, कोणत्या व्यक्तीविरोधात आमचे हे पाऊल नाही. पण, शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. याविरोधात कोणीतरी बोलले पाहिजे. मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही. त्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. ज्या घराण्याचे नाव लावताना मी आवाज उठवला नाही. आम्ही नैतिकदृष्ट्‌या राहू शकत नाही. माझ्या उदयन या नावापुढे राजे लावतो. ज्यांच्यामुळे हे पद, सन्मान मिळाला ते नाव लावायचा मला अधिकार नाही असे ते म्हणाले.

केवळ त्यांचाच अवमान नाही, तर जे महापुरुष ज्यांनी समाजासाठी स्वत: आयुष्य वेचलंय. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज विविध चळवळी, संघटना वाटचाल करत आहेत. त्यांनी योगदान दिले. त्यांचीसुद्धा आज घुसमट होत आहे. छत्रपतींचा अवमान करत असतील तर हा अपमान आम्ही कदापी सहन करु शकत नाही. या लोकांचे मोठे उपकार व योगदान आहे. प्रत्येक चांगल्या कार्याला सुरवात करतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान होतो ही गंभीर बाब असून त्यातून आम्हाला वेदना होत आहेत. त्यामुळे आत्मक्‍लेष करण्यासाठी आम्ही रायगडावर निघालो आहे.

त्या ठिकाणी जाऊन वेदना मांडणार आहोत.” दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करत उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले होते. आता छत्रपतींच्या समाधींसमोर आत्मक्‍लेष करण्यासाठी ते रायगडावर पोहचले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *