दोन मुलींना घेऊन दीपा कार्तिक एकत्र करणार संसार

मित्रानो आयुष्याच्या वाटेवर चालताना विरंगुळा म्हणून कायतरी हवे असते. पूर्वी टीव्ही जास्त नव्हते रेडिओ पण फार कमी लोकांकडे असायचा. आता मात्र सर्वांकडे टीव्ही तर आहेच. त्यासोबत मोबाईल देखील सर्वांकडे आला आहे. अनेक मंडळी अजून देखील टीव्ही बघतात. इतक्या वाहिन्या प्रसारित होतात कि माणसाला काय बघावे हे काळात नाही.

काही मालिका येतात आणि लोकांच्या मनात घर करून जातात. माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका तर टॉप वर टी आर पी घेऊन चालली होती. मात्र ती देखील बंद झाली. अशीच लोकांना आवडणारी मालिका आहे रंग माझा वेगळा. हि मालिका दीपा आणि कार्तिक मुख्य भूमिकेत असणारी आहे. दीपा आणि कार्तिक एकत्र यावे असे सर्वाना वाटत राहते.

अनेक महिने झाले कितीतरी एपिसोड गेले मात्र दीपाच्या नशिबी फक्त दुःख यातना दाखवल्या गेल्या आहेत. प्रेषक दोघांच्या एकत्र येण्याची वाट पाहत आहे मात्र तसे काही होत नाही. आता मात्र मालिकेत चांगलं घडताना दाखवलं जात आहे. दीपिका हि दीपा ची मुलगी आहे हे सिद्ध झाले आहे. दीपा कडे दीपिका गेली सुद्धा. मात्र पुन्हा कोर्टाकडे दीपा ला कार्तिक ने नेले.

कोर्टामध्ये वकील नको ते वाईट दीपा बद्दल बोलतो. त्यामुळे कार्तिक चिडून केस बंद करायला सांगतो. यावर जज सुचवतात कि तुम्ही चौघे एकत्र या. स्वतःचे प्रश्न दूर करून मुलांचा विचार करा. यावर आयेशाखुप जास्त चिडलेली दिसते. मात्र येणाऱ्या भागामध्ये कार्तिक तिघींचे घ्यायला घरी जातो असे दाखवले गेले आहे. मात्र हे स्वप्न आहे कि नाही हे सोमवारच्या भागामध्ये समजेलच.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *