श्वेताचा खेळ ख’ल्ला’स कार्तिक विचारणार जाब

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मध्ये सध्या असे दाखवले आहे की, कार्तिक जो दीपावर एवढे प्रेम करतो आणि विश्वास ठेवतो तोच तिच्या चा’रित्र्या’वर संशय घेतो. ज्यावेळी दिपाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा कार्तिक दीपाला सगळ्यांसमोर म्हणतो, की ही मुले माझी नाहीत. ही मुले सुजयची आहेत आणि तुझे आणि सुजयचे प्रे’म आहे, असे अनेक आरोप कार्तिक दीपावर करतो.

तिच्या पोटातील मुले माझीच आहेत हे सिद्ध करायचे असेल तर तू डीएनए टेस्ट कर असे तो म्हणतो. परंतु दीपा यासाठी तयार नसते कारण तिच्या चा’रित्र्या’वर प्रश्न उठवलेला असतो. दीपा घर सोडून जाते. यामुळे कार्तिक मनातून खूप दुःखी होतो परंतु त्याला समजत नसते काय करावे. तो नंतर रोजप्रमाणे हॉ’स्पि’टलमध्ये जायला लागतो. डॉ कुणालच्या आईला खूप बरे नसते तिची परिस्थिती खूप नाजूक असते.

यावेळी कार्तिक धोका नको म्हणून मोठ्या डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये श’स्त्रक्रियेसाठी बोलावून घेतो आणि शेवटी त्याच्या आईची ती श’स्त्रक्रिया यशस्वी होते. कार्तिकने त्याच्या आईसाठी घेतलेली मेहनत पाहून डॉ कुणाल ला खूप वाईट वाटते. त्याला वाटते की, ज्या व्यक्तीचा मी संसार उद्धवस्त केला त्याच व्यक्तीने आज माझ्या आईचे प्रा’ण वाचवले. या पश्चात्तापामुळे तो कार्तिकला श्वेताबद्दल सर्वकाही खरे सांगतो.

तो कार्तिकला सांगतो की कसे त्याने फर्टि’लिटी सॅ’म्पल बदलले आणि रि’पोर्ट सुद्धा. कार्तिकला समजते की, श्वेतामुळेच त्याचा एवढा मोठा गैरसमज झाला आहे. कार्तिकला वाईट वाटते आणि आता दीपाचा शोध घ्यायचा आणि श्वेताचे पितळ उघडे पाडायचे असे ठरवतो. तो घरी जातो आणि सगळ्यांसमोर श्वेताने केलेल्या या कारस्थानाबद्दल सांगतो. श्वेता तिने केले आहे हे मान्य करत नाही मग डॉ कुणालला बोलवून तो सर्व सर्व सत्य सांगतो.

सगळे ऐकून आदित्य खूप चिडतो आणि श्वेताला मारू लागतो. रागात तो अजून काहीतरी करेल म्हणून सौंदर्या त्याला आवरते आणि श्वेतावरती तीही खूप चिडलेली असते. सौंदर्या कार्तिकला दीपाला शोधण्यासाठी मदत करते. दीपा आता कधी सापडते आणि ती घरी परत येईल का हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला समजेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *