मित्रानो अनेक मालिका येतात आणि जातात परंतु काही मालिका खूप प्रसिद्ध होतात. सध्या टीव्हीवर माझ्या नवऱ्याची बायको हि सर्वात जास्त टीआरपी असणारी मालीका आहे. त्यानंतर अशीच एक मोठी मालिका म्हणजे आगगाबाई सासूबाई. होय आगगाबाई सासूबाई हा मालिका देखील खूप चर्चेत असणारी मलिक आहे.
आगगाबाई सासूबाई या मालिकेत बबड्या, अभिजित राजे, शुब्रा अशी अनेक पात्रे आहेत. पण यातीलच एक पात्र हे जग सोडून गेल्याने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. या मालिकेत बबड्याचे आजोबा आणि आसावरीचे सासरे यांचं निधन झालं आहे. त्या आजोबांचे खरे नाव रवी पटवर्धन आहे. त्यांनी आजोबांची भूमिका उत्तम निभावली होती.
रवी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते एक मोठे अभिनेते होते त्यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले ६ सप्टेंबर १९३७ साली जन्मलेले रवी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. काल रात्री रवी पटवर्धन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही.
पटवर्धन यांना मार्च महिन्यात देखील हृदयविकाराचा झटका आला होता. ‘अग्गबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. सन १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात पवी पटवर्धन यांनी वयाच्या साडेसहा वर्षांच्या वयात भूमिका साकारली होती. बालगंधर्व हे या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईशवर चरणी प्रार्थना.