NMJOKE

ऐश्वर्याची एक नंबरची शत्रू झाली आहे हि अभिनेत्री, नाव ऐकून होश उडतील

मित्रांनो, बॉलिवूडमध्ये सुंदर अभिनेत्रींची कमतरता नाही, परंतु त्यापैकी काही अशा अभिनेत्री देखील आहेत ज्यांना फक्त बॉलिवूडमध्ये त्यांच्या सौंदर्या,मुळे ओळखले जाते. आज आम्ही तुमच्याशी अभिनेत्री ऐश्वर्या राय विषयी बोलनार आहोत. ऐश्वर्याच्या सौंदर्याची प्रसिद्धी भारतातच नाही तर भारताबाहेरील लोक तिला खूप पसंत करतात. पण चित्रपट सृष्टीत अशी एक अभिनेत्रीही आहे जी ऐश्वर्याला अजिबात आवडत नाही. आपण ज्या अभिनेत्रीची येथे चर्चा करणार आहोत ती आहे बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी. होय ऐश्वर्याची सर्वात मोठे शत्रू राणी मानले जाते आणि काही वेळा त्यांचे वैर देखील लोका समोर उघडकीस आले आहे.

एक काळ असा होता की या दोघी एकमेकांच्या खूप चांगलया मैत्रिणी होत्या पण त्यांचे प्रेम हे त्यांच्या शत्रुत्वाचे कारण बनले. वास्तविक पाहता या दोन्ही अभिनेत्रींना एकाच अभिनेत्यावर प्रेम होते. अभिषेक बच्चन मुळेच दोन्ही अभिनेत्रींच्या प्रेमात किंवा मैत्रीत शत्रुत्व आले आणि त्या एकमेकांच्या शत्रू बनल्या. अभिषेकच ऐश्वर्याशी लग्न होण्यापूर्वी अभिषेक बच्चनच्या आयुष्यात राणी मुखर्जी खूप महत्वाची होती आणि अभिषेक च नाही तर संपूर्ण बच्चन कुटुंब त्यावेळी राणीच्या अगदी जवळचे होते. त्यावेळी वाटत होत की अभिषेक आणि राणी फक्त एकमेकांसाठीच बनवले आहेत. पण त्यानंतर दोघे वेगळे झाले आणि त्यांचे नातं तुटलं.‘युवा’ चित्रपटाच्या वेळी राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन जवळ आले. या चित्रपटाचा फायदा दुसर्‍या कोणालाही झाला नाही, परंतु राणी-अभिषेकच्या करिअरसाठी त्यांचा मोठा फायदा झाला. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले. ‘बंटी और बबली’ ची जोडी मजबूत झाली होती. असं म्हणतात की दोघांनीही लग्न करण्याचा विचार केला होता. जया बच्चन यांनाही राणी आवडली होती आणि दोघांनीही लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी राणी मुखर्जी सोबत काम केले होते. या सिनेमातील एका सीनमुळे राणी आणि अभिषेकचे नाते तुटले तसेच जया बच्चन देखील राणीवर नाराज झाली असे चित्रपटातच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चित्रपटाच्या एका सीनमध्ये राणी मुखर्जी अमिताभ बच्चनचे चुंबन घेते. हा किसिंग सीन पाहून अभिषेक खूप रागावला. पडद्यावर राणी आपल्या वडिलांसोबत असा देखावा करेल असा त्याला विश्वास नव्हता. जया बच्चन यांनाही हा सीन आवडला नव्हता. अभिषेकला समजवण्याचा राणीने खूप प्रयत्न केला. पण बच्चन कुटुंबाने आवडत्या राणी ला घरापासून लांब केले. जया बच्चन यांची नाराजी पाहून अमिताभ यांना या प्रकरणात हस्तक्षेपदेखील करता आला नाही. असे म्हटले जाते की म्हणूनच अभिषेक आणि राणीचे नाते कायमचे तुटले व या संधीचा फायदा घेत ऐश्वर्या रायने अभिषेकच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. तेव्हापासून राणी आणि ऐश्वर्या यांच्यात मतभेद सुरू झाले आणि ते दोघे एकमेकांचे शत्रू बनले.परिस्थिती अशी झाली की ऐश्वर्या आणि अभिषेकने त्यांच्या लग्नात राणीला आमंत्रणही पाठवले नाही.
Exit mobile version