NMJOKE

आपल्याच प्रेयसीच्या लग्नात पाहुणे म्हणून पोहचले होते हे कलाकार

मित्रानो तुमचे देखील कोणावर प्रेम जडले असेल आणि तुमचं अफेअर सुरु असेल. मात्र जेव्हा तुमचं ब्रेकअप होत त्यानंतर तुम्ही एकमेकांपासून लांब जाता तुमच्यात काहीच कॉन्टॅक्ट नसतो. मात्र बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अशी अनेक जोडपे आहेत ज्यांचं ब्रेक-अप झाल्यानंतरही त्यांचे संबंध खराब झाले नाहीत. एक प्रकारे ते एकमेकांना भेटतच राहिले आणि त्यांच्या नात्यास कोणत्याही प्रकारचा ताप येऊ दिला नाही. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही एक्स गर्लफ्रेंडची नावे सांगणार आहोत, ज्यांनी ब्रेक-अप नंतरही नातं टिकवलं. अगदी विवाहसोहळ्यात देखील लग्नाचा खूप आनंद घेतला. चला तर मग या जोडप्यांविषयी जाणून घेऊया.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली : बॉलिवूडचा नवीन सुपरस्टार रणवीर सिंग ने अनुष्का शर्माबरोबर चित्रपटात काम करून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता, त्यानंतर त्याच्या अफेअरच्या बातम्या सतत सुरू झाल्या. परंतु हे नातं फार काळ टिकू शकले नाही आणि काही काळानंतर दोघे वेगळे झाले. असे असले तरी यामुळे त्यांचे संबंध खराब झाले नाहीत. जेव्हा अनुष्का शर्माने तिच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केले होते तेव्हा तिने रणवीर सिंगला आमंत्रण पाठवले होते आणि तोही तेथे गेला व लग्नाचा आनंद घेतला.प्रियांका चोप्रा आणि निक जोनस : शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी कधीही नात्यात असल्याचं उघडपणे कबूल केलं नाही, पण बॉलिवूड इंडस्ट्रीला हे ठाऊक आहे की हे दोघे बरेच दिवस एकमेकांना डेट करत राहिले. परंतु त्यांचे हे संबंध कायम टिकले नाही आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाला. भारताची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्रा ने निक जोनासशी लग्न झाल्यावर तिने शाहिदला आमंत्रित केले. देसी गर्लच्या रिसेप्शनला शाहिद कपूर आपल्या पत्नी सोबत आला होता.अंकिता आणि मिलिंद सोमण : मिलिंद सोमण आणि दीपनिता शर्मा यांच्यातील संबंधांबद्दल सर्वानाच माहिती आहे. हे दोघे काही वर्षे एकत्र होते, एकमेकांना डेट करत होते मात्र त्यानंतर ते वेगळे झाले. अलीकडेच मिलिंदने अंकिताशी लग्न केले तेव्हा दीपनिता तिच्यात सामील झाली आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून माहितीही दिली.
Exit mobile version