मलाला म्हणाली पाकिस्तानला द्या काश्मीर, भारतीच्या या खेळाडू ने केली बोलती बंद

पाकिस्तानच्या नोबेल पुरस्कार विजेती ‘मलाला यूसुफजई’ हिने काश्मीर प्रश्नावर दिलेल्या विधानाला भारतीय नेमबाज हिना सिद्धू यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मलालाने काश्मीरमधील मुलींच्या स्थितीबद्दल सोशल मीडियावर लिहिले होते, त्यावर हिना यांनी त्यांना काश्मीरची चिंता सोडून स्वतः पाकिस्तानात परत जाण्यास सांगितले. ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान खूप संतापला होता कारण पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा होताच पण भारताने तेथील ३७० हटवल्याने भारतीय वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर अनेक पाकिस्तानी त्या मुद्द्यावर बोलत होते असेच एका विधानावर भारतीय नेमबाज हिना सिद्धू यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे.

काश्मीरमधील मुलींचा दृष्टिकोन व्यक्त करताना मलालाने शनिवारी असे ट्विट केले की, “मी शाळेत जाऊ शकत नाही, यामुळे मला दिशाहीन आणि निराश वाटते.” मी १२ ऑगस्टला माझ्या परीक्षेत बसू शकली नाही, मला माझ्या भविष्याबद्दल खूप असुरक्षित वाटते. मला लेखिका बनायचे आहे आणि स्वतंत्र यशस्वी काश्मिरी महिला म्हणून मोठे व्हायचे आहे. मात्र जाहीर झालेल्या वातावरणात या देशात मला पुढे जण खूप कठीण होत आहे.” असे विधान पाहिल्यानंतर अनेकांनी आपले मत मांडले आहेच मात्र भारतीय नेमबाज हिमा सिद्धू यांनी चोख प्रतिउत्तर मालाला ला दिले आहे.हिनाने मलालाला उत्तर म्हणून लिहिले की, “तुमचे असे म्हणणे आहे की काश्मीर पाकिस्तानला देण्यात यावे जेणेकरून चांगल्या मुलींना शिक्षणाच्या अधिक संधी मिळाल्या पाहिजेत.” हिना यांनी मलाला आरसा दाखवून मलालाची आठवण करून दिली. पाकिस्तानात राहत असताना मलाला जवळजवळ आपला जीव गमावता गमावता वाचली होती. त्यानंतर मलाला आपला देश पाकिस्तान सोडून अशी पाळली कि ती पुन्हा पाकिस्तानात पुन्हा परतली नाही. तू आम्हाला आधी पाकिस्तानात परत जाऊन का दाखवत नाहीस? असे चोख उत्तर देऊन भारतीय नेमबाज हिना सिद्धू ने मलाला ची बोलती बंद केली. महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून त्याबाबत सातत्याने बडबड सुरू आहे. या संदर्भात भारताची स्थिती स्पष्ट आहे, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो त्याच्या विकासासाठी आवश्यक ती पावले उचलेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *