लग्नाच्या अगोदर चुकूनही ह्या गोष्टी तुमच्या पार्टनरसोबत शेअर करू नका, नाहीतर मोडू शकते लग्न

देश कोणतेही असो, प्रत्येक देशात लग्नाचे महत्व एक सारखेच असते. भारतात लग्नाला सांस्कृतिक रूपात साजरे केले जाते. ह्यामुळे इथे लग्नाचे महत्व थोडे जास्त वाढले जाते. लग्न दोन लोकांमध्ये मॅकमेकांच्या संमतीनेच होते. आता तो जमाना गेला जेव्हा एकमेकांच्या मर्जीशिवाय लग्न व्हायची. आजच्या युगात लग्नासाठी दोघांची संमती असणे खूप गरजेचे आहे. असं नसलं कि नातं जास्त काळ टिकत नाही.

लग्न आणि आणि साखरपुड्यामध्ये ठेवले जाते काही दिवसांचे अंतर –
आज सुद्धा आपल्या देशात सर्वात जास्त अरेंज मॅरेजच होतात. अरेंज मॅरेज मध्ये बहुतेकदा घरातल्यांच्या आवडीच्या मुली किंवा मुलासोबत लग्न होते. अशामध्ये दोघांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेणे हे दोघांसाठी खूप जरुरीचे असते. ह्यामुळेच साखरपुडा आणि लग्न ह्यामध्ये काही दिवसांचे अंतर ठेवलं जाते. कारण ह्यादरम्यान दोघेही एकमेकांबद्दल चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. ह्यादरम्यान दोघेही पार्टनर एकदुसर्यांसोबत भेटतात किंवा फोन वर गप्पा मारून एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. खूप वेळा फोनवर बोलताना अचानक तोंडातून काही अश्या गोष्टी बाहेर पडतात ज्या नाही बोलायच्या असतात. मग ती माहिती स्वतःबद्दल असेल किंवा मग कुटुंबाबद्दल सुद्धा असू शकते. फोनवर अचानक बोलल्या गेलेल्या ह्या गोष्टींचा परिणाम तुमच्या नात्यावर सुद्धा होऊ शकतो. अनेकदा ह्याकारणामुळे लग्न होण्याच्या अगोदरच मोडून जाते. आज आम्ही तुम्हांला अश्याच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही लग्नाअगोदर चुकूनही तुमच्या पार्टनरसोबत शेअर करू नये.
लग्नाअगोदर तुमच्या पार्टनरला ह्या गोष्टी सांगणे टाळा –
तुमच्या भूतकाळाबद्दल : प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा एक भूतकाळ असतो. हा चांगला सुद्धा असतो आणि वाईट सुद्धा असतो. भूतकाळात काही अश्या घटना घडतात ज्या रहस्यच राहिलेल्याच जास्त चांगल्या असतात. ह्यामुळे मुलगा असो वा मुलगी लग्नाअगोदर तुमच्या पार्टनर सोबत तुमच्या भूतकाळाबद्दल न बोललेलंच जास्त चांगलं असते.
कुटुंबाबद्दल गोष्टी : प्रत्येक कुटुंबाचे आपले स्वतःचे काही रहस्य असतात. तसे तर भारतात लग्नाअगोदर दोन्ही कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यानंतर केली जाते. चांगल्या प्रकारे जाणल्यानंतरच लग्नाची वार्ता पुढे वाढवली जाते. तरीसुद्दा तुमच्या कुटुंबाविषयी काही गोष्टी अश्या असतात ज्या कोणालाच माहिती पडायला नकोत. खासकरून तर जेव्हा तुमचे लग्न होणार असते तेव्हा.आर्थिक परिस्थिती : मुलगी असो वा मुलगा दोघांनाही लग्नाच्या अगोदर आपल्या पार्टनर सोबत आर्थिक परिस्थितीबद्दल विचारणे टाळले पाहिजे. लग्नाच्या दरम्यान बहुतेक आईवडील मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतात आणि हळूहळू ते कर्ज चुकवत असतात. अशामध्ये जर तुम्ही सरळ तुमच्या पार्टनर सोबत ह्या गोष्टीबद्दल सांगणार तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो.
चुकूनही तुमची कमजोरी सांगू नका : प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमजोरी हि असतेच. खरंच सांगितले आहे कि ह्या दुनियेत कुणीच परफेक्ट नाही आहे. काही अश्या कमजोरी सुद्धा असतात ज्याबद्दल कुणासोबत सुद्दा नाही इतकंच काय तर तुमच्या पार्टनरसोबत सुद्धा शेअर करणे टाळावे. हे सुद्धा होऊ शकते कि तुमच्या त्या कमजोरीमुळे तुमचा पार्टनर लग्नाला नकार देऊ शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *