लग्नाचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण स्थान आहे. लग्न करणेहा प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असतो. लग्नाचा चुकीचा निर्णय हा फक्त दोन लोकांचा नाही तर दोन परिवाराचे जीवन उध्वस्त करू शकतो. म्हणूनच लग्नाचा हा महत्वपूर्ण निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. लग्नानंतर लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल येतात. लोकं मानतात कि लग्नानंतर जास्त ऍडजस्ट मुलींनाच करावं लागतं कारण त्या आपल्या कुटुंब आणि घर सोडून आलेल्या असतात. काही गोष्टीपर्यंत हे खरं सुद्धा आहे.

शेयरिंग करणे शिकतो : एकटं राहण्याची पण एक वेगळीच मजा आहे. लग्नाअगोदर पुरुष मुक्तपणे राहत असतो. परंतु लग्नानंतर त्याचे हे मुक्तपण थोडं कमी होते. त्याची पर्सनल लाईफ पहिल्यासारखी नाही राहत. त्यांना आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या पार्टनर सोबत शेअर करावी लागते. लग्नानंतर पहिला पत्नी नंतर मुलांसोबत वेळ विभागला जातो.

काळजी करणे शिकून जातो : लग्नाअगोदर पुरुषांमध्ये निष्काळजीपणा थोडा जास्त असतो. ते आपल्या वस्तूंचे विशेष काळजी घेत नाहीत. परंतु लग्नानंतर ते जबाबदार होतात. ते आपली निष्काळजीपणा आणि बेफिकिरपणा दूर करून आपल्या पार्टनरचे खूप काळजी घेऊ लागतात.

मौजमस्ती कमी होते : लग्नानंतर पुरुषांची बॅचलर लाईफ जवळजवळ संपते. लग्नानंतर त्यांची पहिली प्रायोरिटी आपल्या लाईफ पार्टनरसाठी वेळ देणे असते.
शौक-छंद ह्यावर आवर घालावा लागतो : लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने पुरुषांना आपल्या शौक वर बंधनं घालावी लागतात. नोकरीसोबत त्यांना आपल्या परिवारासाठी वेळ द्यावा लागतो. वेळेच्या कमतरतेमुळे त्याला त्याचे शौक पूर्ण करता येत नाहीत.
भविष्याच्या दृष्टीने सतर्क : लग्नानंतर व्यक्ती आपल्या भविष्याच्या दृष्टीने खूप सतर्क होतो. त्याच्यावर आपल्या पार्टनरला सुखी ठेवणे आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदरी असते.