एक काळ होता ज्यावेळी आमिषा पटेल टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. “कहो ना प्यार है” आणि “गदर” या दोन चित्रपटांनी तिला यशाच्या उंच शिखरावर नेलं. मात्र नंतर अमिशाच नशीब इतकं पालटलं कि तिला फ्लॉप अभिनेत्री म्हणून लोक ओळखू लागले. आज आम्ही तुम्हाला त्या काळाबद्दल सांगणार आहोत जेव्हा अमिषा पटेल खूप मोठी अभिनेत्री झाली होती कारण तिचा कहो ना प्यार है हा चित्रपट खूप गाजला होता. त्यावेळी आमिषा आणि करीना दोघांमध्ये जणू शीतयुद्ध सुरु होत. या दोघींविषयी मॅगजीन्स मध्ये अनेक गोष्टी छापल्या जायच्या.
पुढे आमिषा म्हणाली “आमच्या दोघां मध्ये कॉम्पिटिशन असल्याचं खूप जणांनी लिहल आहे मात्र मी कधीच करीनाला इतकं महत्व दिल नाही. हि मूर्खता असेल कि तुम्ही आम्ही दोघीना टॉप ची अभिनेत्री म्हणाल. मी करीनाचे काम पाहिलं आहे, तिच्यामध्ये ते नाही जे माझ्यामध्ये आहे. सूर्य बाजूने पाहायचे झाले तर इंडस्ट्री मध्ये खूप काम आहे मग भांडण कश्यासाठी.” करीनच असं देखील म्हणणं आहे कि तिने खूप मेहनत करून यश मिळवलं आहे आणि तिच करिअर कोणी बरबाद नाही करू शकत. सध्या अमिषाला चित्रपटात काम मिळत नाही मात्र एकेकाळी ती यशाच्या उंच शिखरावर होती.