२ नवऱ्याना घटस्फोट देऊन आता शोधत आहे तिसरा नवरा हि अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये लग्नाचे एवढे महत्त्व नाही, त्यामुळेच लग्नानंतर लगेच घटस्फोट घेतात आणि पुन्हा लग्न करतात. तरुण अभिनेत्री तर असं करतच आहेत पण ज्या आता वयाने खूप मोठ्या आहेत त्यासुद्धा अजून लग्न करत आहेत. आत्ता आपण अभिनेत्री दीपशिखा नागपाल हिच्याबद्दल बोलत आहोत. जिने आपल्या २ नवऱ्याना घटस्फोट दिला आहे आणि आता ती अजूनही तिच्या नव्या जोडीदाराच्या शोधात आहे. बादशाह, कोयला यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि बऱ्याच मालिकांमध्ये दीपशिखाने काम केले आहे.

दीपशिखा आजही खूप सुंदर दिसते. तिच्या खऱ्या जीवनातील कहाणी तुम्हाला समजली तर तुम्हाला आश्चर्य वाटेन. तुमचाही या गोष्टीवर विश्वास नाही बसणार. दीपशिखाने २ लग्न केली आहेत आणि घटस्फोट दिल्यानंतर २ मुलांचा ती सांभाळहि ती करत आहे पण तिला एकटीला एवढं सगळं करणं जमत नाहीये. त्यामुळे तिला जोडीदाराची गरज आहे. दीपशिखाने ११९७ साली अभिनेता जीत उपेंद्र बरोबर लग्न केले आणि नंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाले. परंतु काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाली आणि दोघीही वेगळे झाले. २०१२ साली तिचे लग्न केशव अरोराबरोबर झाले. त्याच्याबरोबर ४ वर्ष राहिल्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये भांडण चालू झाले आणि ती पुन्हा घटस्फोट घेऊन एकटी राहू लागली. तिने एका मुलाखतीमध्ये सांगिले कि ती दोन्ही मुलांना एकटी नाही सांभाळू शकत आहे. तिला मालिकेच्या शूटसाठी कधी इकडे तर कधी तिकडे जावे लागते. ती बोलली कि घटस्फोट झाल्यानंतर मी खूप एकटी झाली आहे. मला एका मालिकेच्या शूटिंगसाठी जयपूर जावं लागायचे आणि मग माझी मुले इथे मुंबईत एकटे राहायची. मला मुलांना तस एकटे ठेवून जाऊ नाही वाटायचे आणि खूप दुःख व्हायचे. नंतर जसा वेळ मिळेल तसं मी त्यांना भेटायला मुंबईला यायचे. ती म्हणते कि मी खूप नशीबवान आहे कि मला अशी समजूतदार मुले भेटली आहेत. या धावपळीमुळे तिचे आणि तिच्या मुलांचे नातेही तेवढेच मजबूत बनत चालले आहे. तिने सांगितले कि ती आता खूप थकली आहे आणि तिला जर कोणी चांगली व्यक्ती भेटली तर ती लग्नही करू शकते.

1 comment

  1. मैं तैयार हुं आपशे शादी करने के लिय

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *