आधी नवऱ्याने घातला हार जेव्हा मुलीची पाळी आली तर थांबवला हात, म्हणाली नाही करायचं लग्न कारण….
harshaddhotre5@gmail.com
जेव्हा मुलगी लग्नबंधनात अडकते तेव्हा तिला आपलं घर सोडून दुसऱ्या घरात जावं लागत. तिची अनेक स्वप्ने लग्नानंतरची असतात, त्यामुळे तिने आपलया पसंतीचा मुलगा निवडावा यासाठी तिला स्वतंत्र असंन गरजेचं आहे. मात्र आज देखील अनेक खेडे गावांमध्ये मुलीला काहीच न विचारता आई वडील तीच लग्न लावून देत असतात. असच प्रीती नावाच्या एका मुलीचं लग्न देखील तिच्या घरच्यांनी ठरवलं होत आणि सहा महिन्यापूर्वी त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. काही दिवसांपूर्वी सहा महिन्यानंतर त्यांचं लग्न होणार होत. मुलाकडचे वरात घेऊन आले तेव्हा मुलीकडच्यांनी देखील त्यांचं स्वागत आनंदात केलं.
स्टेज वर लग्न सुरु होत नवरदेवाने नवरीच्या गळ्यात हार घातला मात्र त्याच वेळी जेव्हा मुलीची हार घालायची वेळ आली तेव्हा तिचे हात थांबले. मुलीने सांगितले मला नाही करायचे लग्न, हे ऐकताच सगळे लोक हैराण झाले. मुलीला अनेकांनी लग्न न करण्यामागचं कारण विचारलं तेव्हा मुलीने उत्तर दिल कि, मी आज पहिल्यांदा मुलाचा चेहरा पाहत आहे आणि मला हा मुलगा पसंत नाही. प्रीतीचं हे वाक्य ऐकून अनेकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तीने नाही ऐकले व शेवटी हे लग्न मोडावे लागले. मुलीकडच्यांनी मुलाला दिलेला हुंडा परत मागितला आणि मुलाकडाच्याने देखील मुलींसाठी आणलेले दागिने तिला न देता ते वरात घेऊन घरी परतले. प्रीती कुशवाह च म्हणणं आहे कि तिने अनेकदा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो पाहण्यासाठी मागितला मात्र घरच्यांनी त्याला सिरीयस घेतले नाही आणि जेव्हा शेवटी लग्नाची वेळ आली तेव्हा हा प्रकार घडला. प्रितीने घेतलेला निर्णय तिला योग्य वाटतो तुम्हाला याविषयी काय वाटते ते आम्हाला नक्की काळवा. मात्र यावरून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीचं लग्न करताना तिच्या मर्जीनुसार होऊद्या नाहीतर काहीही होऊ शकते.