या अभिनेत्याच्या प्रेमात हद्द पार करून बसली होती करिष्मा, लग्नानंतर देखील एकटीच जगत आहे जीवन
harshaddhotre5@gmail.com
बॉलिवूड मध्ये प्रेम आणि प्रेमभंग व्हायला वेळ लागत नाही. काहींचं प्रेम शेवट्पर्यंत टिकत तर काहींचं खूपच लवकर विस्कटत. बॉलिवूड मध्ये जास्त करून प्रेमाला बंधने नसतात कोणीही कोणाशीही पेम करत. जात, धर्म, वय कसलेच भान न ठेवता प्रेम करतात आणि लग्न देखील करतात हे काही बॉलिवूड साठी वेगळं नाही. आज आपण करिष्मा कपूर सोबत घडलेल्या घटनेबद्दल पाहणार आहोत. ९० च्या दशकात करिष्मा कपूर सर्वात महागडी अभिनेत्री असायची. करिश्माने सर्व चित्रपट हिट व्हायचे आणि गोविंदा सोबत तर हिची जोडी खूप जमायची.
करिष्मा ने शाहरुख, सलमान, आमिर, अनिल कपूर आणि अक्षय कुमार सारख्या अभिनेत्यांसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स केला. मात्र एक अभिनेता असा होता ज्याच्यासाठी सर्व हद्द करिश्माने पार केली. करिश्माला लग्न देखील करायचे होते मात्र अभिनेत्याच्या आईमुळे तीच स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. २००० साली करिष्माच्या जीवनात अभिषेख बच्चन आला आणि करिष्मा अभिषेखवर खूप प्रेम करू लागली. काही महिन्यांनी त्यांचं लग्न देखील होणार होत साखरपुड्याची तारीख देखील निश्चित केली गेली होती.करिष्मा आणि अभिषेख यांचं लग्न व्हावं अशी अभिषेखची आई जया बच्चन ची इच्छा नव्हती. जया बच्चन मुळे हे नाते पुढे जाऊच शकले नाही. यामुळे करिश्माला धक्का बसला आणि ती घरातल्यान कोणासोबतही लग्न करेल असं म्हणाली. घरातल्यांनी दिल्लीमधील बीजनसमन संजय कपूर सोबत करिष्माच लग्न ठरवलं आणि २००३ मध्ये हे लग्न झालं. दोघांना दोन मुलं देखील झाली मात्र २०१० साली पती पत्नींमध्ये भांडण झाल्याने २०१४ साली करिश्माने घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये संजय कपूर ने दुसरं लग्न केलं मात्र करिष्मा आपल्यामुलांसोबत अजूनही एकटीच राहत आहे.